पारनेर कारखान्याची विक्री बेकायदेशीरच ; शेतकरी - कामगार महासंघाची देवीभोयरेत बैठकित सभासदांचा एल्गार
पारनेर प्रतिनिधी
पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री बेकायदेशीर झाली असून हा कारखाना सभासदांचाच आहे असा एल्गार करत लवकरच सभासद,शेतकरी व कामगार पारनेर कारखान्याचा ताबा घेणार असल्याची घोषणा देवीभोयरे येथील शेतकरी कामगार महासंघाच्या बैठकीत करण्यात आली . राज्य सहकारी बँकेतील घोटाळा उघड करणारे शेतकरी - कामगार नेते माजी आमदार माणिकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभासदांनी व शेतकऱ्यांनी एल्गार केला.
![]() |
| पारनेर सहकारी साखर करण्याच्या सभासदांना मार्गदर्शन करताना शेतकरी -कामगार नेते माणिकराव जाधव. समवेत मान्यवर .. छाया - चंद्रकांत कदम |
राज्य सहकारी बँकेने किरकोळ कर्जासाठी पारनेर साखर कारखान्याची बेकायदेशीर विक्री केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पारनेर कारखान्याची विक्री नसून तो क्रांती शुगरचा अतिक्रमण व कब्जा असल्याचा घनाघाती आरोप माजी आमदार जाधव यांनी यावेळी केला . हा ताबा मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेची ताकद पारनेर कारखान्याच्या सभासदांना व शेतकऱ्यांना देणार असून अतिक्रमण काढल्यासारखा हा ताबा उलथवुन टाका असे आवाहन जाधव यांनी पारनेरकरांना केले. राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालात पारनेर कारखान्याला बेकायदेशीर विकल्याचा ठपका देखील ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . पारनेर प्रमाणे राज्यातील इतर ४९ सहकारी कारखाने या बँकेने विकले आहेत . मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर या बॅकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे . सुप्रीम कोर्टानेही या गुन्ह्याला स्थगिती नाकारली आहे . आता या गुन्ह्याचा तपास सध्याचे राज्य सरकार करू इच्छित आहे .आधीचा तपास मागे घेत असल्याचे सरकारने न्यायालयात म्हणणे मांडले होते परंतु सरकारचे हे म्हणणे याचिकाकर्ते यांना मान्य नाही . आधी तो तपास चुकीचा असल्याने रद्द करा, मगच नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले .
पारनेर कारखान्याचे अस्तित्व आजही अबाधीत असून कारखान्याचे अवसायनातुन पुनर्जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी बचाव समितीचा प्रयत्न उचित असून , त्यांच्या मागणीला शेतकरी महासंघाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले .आता कारखान्याचा ताबा घेताना तुमचे पारनेरचे आमदार निलेश लंके सभासदांची की क्रांती शुगरची बाजू घेणार हे आता तुम्हाला पहावे लागेल . राज्यातील विक्री झालेले साखर कारखाने तेथील सभासद हळूहळू ताबा घेणार आहेत. त्यासाठी मी जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याचे शेतकरी- कामगार नेते माजी आमदार माणिकराव जाधव यांनी सांगितले. राज्यातील पारनेर कारखाना प्रथम ताब्यात घेण्यात येईल असा ठराव देखील या बैठकीत शेतकऱ्यांनी व सभासदांनी केला .यावेळी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे , बबनराव कवाद यांनी पारनेरच्या विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली व आम्हाला पारनेर ताब्यात घेण्यासाठी राज्यातील महासंघाने मदत आमच्या मागे उभी करावी अशी मागणी देखील जाधव यांच्याकडे केली . हा कारखाना ताब्यात घेवून उत्तम चालवुन दाखवू असा आत्मविश्वास बचाव समितीचे रामदास घावटे यांनी व्यक्त केला . यावेळी भाऊसाहेब खेडेकर, पांडुरंग पडवळ , रामदास कवडे , कृष्णाजी बडवे , जालींदर सालके , ओंकार सालके, संकेत शेळके , अमोल ठुबे ,भाऊ पानमंद ,पोपट लंके , शिवाजी क्षिरसागर ,संपतराव वाळुंज ,सुभाष बेलोटे ,विठ्ठल कवाद ,शंकर गुंड , रघुनाथ मांडगे, संभाजीराव सालके , बबनराव सालके ,गोविंद बडवे , ज्ञानदेव पठारे , दत्ता भुकन , बाबाजी गाडीलकर ,श्रीधर गाडीलकर ,शंकर तांबे, एकनाथ गुंजाळ भानुदास साळवे , दिगंबर घोगरे , दत्ता पवार , शिवाजी पवार , बाबुराव मुळे यांच्यासह अनेक शेतकरी कामगार उपस्थित होते .


0 Comments