पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू - पो.नि. संभाजीराव गायकवाड
पारनेर मध्ये राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा.शिवतेज मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम...
( पारनेर प्रतिनिधी ) : महेश शिंगोटे.
पारनेरमध्ये राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान व फराळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.कार्यशिल पत्रकार,व समाजासाठी वाहून गेलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा मानस असल्याचे शिवतेज सोशल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा मिनाक्षी जगदाळे यांनी सुचविले त्यानुसार राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत पारनेर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शिवतेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप बोरुडे यांनी सांगीतले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक हनुमान उगले,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव दत्ता गाडगे,जेष्ठ नेते गुलाबराव नवले हे उपस्थित होते.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार विनोद गोळे,दत्ता उनवणे,बाबाजी वाघमारे, संतोष तांबे,लतिफ राजे,विजय रासकर, महेश शिंगोटे,संदीप गाडे, विशाल फटांगडे,वसंत रांधवण, सागर आतकर,आनंदा भुकन,नितीन परंडवाल,संतोष गायखे,सुदाम दरेकर आदींसह तब्बल २१ पत्रकारांचा पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पारनेर पं.स.सदस्य डाॅ.श्रीकांत पठारे,उपनिरीक्षक हनुमान उगले आदींचे हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकारांना फराळ वाटपही करण्यात आहे.
यावेळी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले, पोलीस आणि पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.ज्यावेळी मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी ज्या पद्धतीने पोलीस लढत होते, त्याच पद्धतीने पत्रकार देखील लढत होते.पोलिसांकडे संरक्षणासाठी वेपनास्र होते.पण पत्रकार यांचेकडे कुठलेही वेपन नव्हते.त्यांच्याकडे त्यांची लेखनी आणि अचूक चित्र कॅमेऱ्यात टिपून ते जनतेपर्यंत पोहचवणे यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते.
कुठलेही एखादे खाते किंवा विभाग हे खराब नसते,त्यांच्यामध्ये काही गोष्टी,व्यक्ती खराब येतात आणि गालबोट लागत.संपूर्ण पोलीस खातं जर कोणी खराब म्हणेल तर मग संरक्षण कोण करतय...? गुन्हेगारीला पायबंद कोण घालतंय...? हा प्रश्न देखील निर्माण होईल.सर्व पत्रकार वाईट नसतात.आज पत्रकारीतेचे ज्या पद्धतीने असे वाभाडे काढले जाते. परंतु मग या मी मी म्हणाऱ्यांची नशा नक्की कोण उतरवतय...? निश्चितच पारनेरमधे पत्रकारांचे काम चांगले आहे.पोलीस व पत्रकारांना,लोकांना जवळून पाहण्याची सवय नसते. दोघांमध्ये अंतर असेल तर निश्चतच शंका निर्माण होते.आपल्यात संवाद नसल्यामुळेच एकेरी मूल्यमापन केले जाते.त्यामुळे चुकीच्या लोकांसोबत दोघांनाही एकाच तराजूत तोलले जाते.
समाजामध्ये काम करत असताना आपण लढत असतो.आपली कोणी दखलच घेत नसेल तर मात्र आपण सर्वसामान्य माणसं आहोत.जरी पोलीस असो पत्रकार असो तरी आपण आधी माणूसच आहोत. कोणीतरी आपल्याला लढ म्हणण्याचं पाठबळ आपल्याला देणं गरजेचं असतं.आणि ते पाठबळ देण्याचे पवित्र कार्य शिवतेज सोशल फाउंडेशनने या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने केले आहे.
यावेळी बोलताना पारनेर पंचायत समीती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले,निःपक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
खर पाहायला गेलं तर पत्रकार हे सामाजिक क्षेत्र आहे.बाकीच्या ठिकाणी पत्रकारिता कशी चालते हे मला माहीत नाही.पण पारनेर तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने पत्रकार बांधव काम करत आहेत.खर तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.अनेक अडचणींना सामोरे जाऊन पत्रकार बांधव रोकठोक निर्भिड निःपक्ष काम करत असतात.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासाचिव दत्ता गाडगे म्हणाले, १६ नोव्हेंबरला जबाबदार पत्रकारीतेचे प्रतिक म्हणुनच हा राष्ट्रीय पत्रकारदिन साजरा केला जातो.सामाजिक भावनेतुन काम करणारा पत्रकार हासुद्धा एक समाजसेवकच असतो.एखाद्याबद्दल चांगला लेख,बातमी,पत्रकार लिहीतो यालासुध्दा बुध्दीचा वापर करावा लागतो.म्हणजे पत्रकारीता हासुध्दा एक साहीत्याचाच भाग आहे.पत्रकार हा उत्तम साहीत्यिक असतो. समाजाने पत्रकारासोबत सुसंवाद करायला हवा.पोलीस व पत्रकार यांच्या कामामधे बरेच साम्य आहे.अतिशय दूर्गम भागामधे बातमीदारी करणारा पत्रकार फाटका असला तरी तो प्रामाणिकपणे बातमीदारी करत असतो असे सांगत सर्व पत्रकार बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांचे आभार शिवतेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप बोरुडे यांनी मानले.

0 Comments