आरोग्य केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रत्येक वाडीवस्तीवर करणे गरजेचे - शरद पवळे

कोरोना लढ्यात लसीकरण ढालीसारखे ; नागरिकांनी प्रत्येकाने लसीकरण करावे - शरद पवळे

पारनेर प्रतिनिधी 


कोरोनाचा कहर वाढत असून प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे महत्वाचे आहे. लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांवर गर्दी होत असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्रत्येक गावात- वाडीवस्तीवर नागरिकांना लसीकरण केल्यास कोरोनावर मात करणे सोपे होईल असे मत समाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी व्यक्त केले.




कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तिव्रता अत्यंत भयंकर असुन या लाटेमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये अनेकजन जीवाची पर्वा न करता या लढ्यामध्ये जीवाची बाजी लावुन यथाशक्ती योगदान देत आहेत. आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी धोकादायक असुन खेड्यापाड्यातील नागरिकांना आरोग्य केंद्रात रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यांचा येण्या जाण्याचा संघर्ष त्यातच १ मे पासुन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरु झाल्यास मोठी गर्दी आरोग्य केंद्रामध्ये होईल. यासाठी आरोग्य विभागाने उपकेंद्रांच्या माध्यमातुन वाडीवस्तीवर नागरिकांच्या याद्या करुन सोशल डिस्टंसिंग पाळत रुग्णवाहीकेच्या माध्यमातुन लसीकरणाचे डोस दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. व पुढचा येणारा धोका यामुळे टळेल त्याचबरोबर नागरिकांनी आलेल्या संकटाला स्वत:ला सुरक्षित ठेवुन सामोरे गेले पाहीजे. परिस्थितीचे गांभिर्य पाहुन प्रत्येकाने या कोरोनाच्या लढ्यात प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतलच पाहीजे. व ईतरांनाही प्रोत्साहीत करुन कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी नागरिकांनी लसीकरणाची ढाल पुढे केल्यास कोरोसोबतची लढाई आपण नक्कीच जिंकणार आहे.
 वाडीवस्तीवर लसीकरण याविषयी आपण आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  सांगितले.

Post a Comment

0 Comments