शासणाच्या योजना कागदावरच प्रत्यक्ष अमलबजावनी नाही - जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे


पारनेर प्रतिनिधी

       शासनाच्या  योजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची खंत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. याबाबत नागरिकांनी जनांदोलनाचा माध्यमातून समोर येण्याचे आवाहन देखील अण्णांनी केली. गावोगावचे शिवपानंद रस्ते खुले करून देण्यासाठी उभारलेल्या आवाज दो आंदोलनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जनजागृतीचे पाहिले पत्रक देऊन राळेगणसिद्धी मधून केला. यावेळी आण्णा बोलत होते.

शिवपानंद रस्ते खुले करून देण्यासंदर्भात उभारलेल्या आवाज दो जनांदोलनाचा शुभारंभ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जनजागृतीचे पाहिले पत्रक देऊन करण्यात आले. यावेळी शिवपानंद रस्ता कृती समितीचे समन्वयक. छाया - चंद्रकांत कदम


महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका देशात नवनवीन चळवळी उभारुन देशसवेसाठी आग्रभागी राहीला असुन समाजसेवेचे नवे रोपटे याच तालुक्यात नव्याने वाढु लागुले आहे पारनेर तालुक्यातच नव्हे तर सपुर्ण शेतकरी वर्ग पाण्याइतकाच रस्त्यासाठी संघर्ष करत असुन गावोगावचे शिवपाणंद रस्ते खुले झाल्यास शेतकर्‍यांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न मिटेल व शेतकर्‍यांची अनेक भांडणे प्रशासणाच्या नाकर्तेपणामुळे आज कोर्टात चालु आहेत यासाठीच पारनेर तालुक्यात शेतकर्‍यांनी एकत्र येत पारनेर तहसिलवर वेगवेगळी आंदोलने करुन प्रशासणाचे लक्ष वेधले असुन याला व्यापकता देण्याचे काव पुन्हा नव्याने शिव पाणंद रस्ते नवनिर्माणकृती समितीच्या माध्यमातुन  चालु आहे त्याचबरोबर जेष्ठ समाजसेव आण्णासाहेब हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पाझर तलाव,बंधारे यांची होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी प्लॅस्टीक पेपर अस्तरिकरणाचा प्रयोग गावात राबवला याचा मोठा फायदा राळेगणसिद्धि परिवाराला झाला असुन असा कमी खर्चाचा प्रयोग सरकारने राज्यात राबवा म्हणुनच महाराष्ट्रात शेतकरी शेतरस्ते संघर्ष मुक्ती व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती अभियान अभियान राबवुन राज्यात आवाज दो जनआंदोलनाचा लढा उभा करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब यांना जनजागृतीचे पहीले पत्रक देत आण्णांचे मार्गदर्शन घेवुन आवाज दो आंदोलनाचा शुभारंभ   राळेगणसिद्धि येथुन करण्यात आल्याचे सामाजिक कार्यर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.


शिव पाणंदसोबत प्लॅस्टिक पेपर आस्तरीकरणाचा प्रयोग राज्यात राबवाण्यासाठी आवाज दो जनआंदोलन - सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे

शेतकरी शेतरस्ते मुक्ती व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती करुन राज्यात आवाज दो आंदोलन उभे करुन गावागावातील शेतकर्‍यांचे शेतरस्ते खुले व्हावेत व पाझर तलाव,बंधारे यांची होणारी गळती थांबवण्यासाठी प्लॅस्टिक पेपर आस्तरणीकरचा कमी खर्चाचा प्रयोग गावोगावी राबवल्यास दुष्काळाची समस्या मिटेल व शेतर्‍यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल- सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे

Post a Comment

0 Comments