प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तालुका सुरक्षित : सरपंच पंकजदादा कारखिले

पोलिस कर्मचाऱ्यांना विषमुक्त भाजीपाला वाटप
रोख ठोक न्यूज:-
पारनेर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना व पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी यांना विषमुक्त भाजीपाला देताना सरपंच पंकज कारखीले , युवा नेते विजू औटी. 

         सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रावर कोणाचे संकट आहे त्या संकटाला आपल्या महाराष्ट्राचे पोलीस ,आरोग्यसेवक त्यांच्या जीवाची पर्वा न करता जनतेची अहोरात्र सेवा करत आहे. अशा कोरोना योध्यांच्या कार्याची दखल घेऊन राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा व पारनेर एग्रीटेक प्रोडूसर कंपनी यांनी पारनेर येथे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विषमुक्त भाजीपाल्याची वाटप करण्यात आले.
             तसेच राळेगण थेरपाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना भाजीपाला वाटप करण्यात आला. पारनेर अग्रिटेक प्रोडूसर  कंपनीच्या कामाची प्रशंसा पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी , पोलीस उपनिरीक्षक बोत्रे  व इतर पोलीस कर्मचारी यांनी केली.  यावेळी राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकजदादा कारखिले, गांजीभोयरे सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे, राळेगण विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक शशिकांत कारखिले, सुखदेव कारखिले, उपसरपंच योगेश आढाव, युवा नेते विजूशेठ औटी, संदीप घावटे, शिरीष कार्ले, श्रीकांत खोडदे,जयदीप कारखिले, नरेश सोनवणे, अतुल मोरे, निलेश शितोळे,मंगेश कार्ले, दिनेश कारखिले आणि आय सी आय सी आय फाउंडेशनचे समन्वयक चेतन पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments