ऑनलाईन शिक्षणपद्धती ग्रामीण भागासाठी फोल ठरली
पारनेर प्रतिनिधी
देशातील वाढता संसर्ग लक्षात घेता नव्याने रुजु घातलेली आॅनलाईन शिक्षण पद्धती ग्रामीण व अती ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कितपत लाभदायक आहे हा संशोधणाचा विषय ठरेल ग्रामीण भागातील मौबाईल नेटवर्कचे कवरेजची समस्या,अखंडीत विद्युत पुरवठ्याची समस्या,शेतीप्रधान अर्थव्यवस्थेमुळे मुळातच असलेल्या आर्थिक चणचणीबरोबर ग्रामीण भागात असणारा अशिक्षीत पालक वर्ग हे सर्व लक्षात घेता आॅनलाईन शिक्षण पद्धत्ती ग्रामीण भागासाठी फोल ठरल्याचे सिद्ध होत आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था व आॅनलाईन शिक्षणपद्धतीमुळे ग्रामीण व शहरी मुलांमध्ये वाढत चाललेली शैक्षणिक गुणवत्तेतील दरी ही एक नविन गंभीर समस्या नव्याने निर्माण होत आहे.गरिब श्रीमंत दरीसोबतच मुलांमधील शैक्षणिक गुणवत्तेतील दरी सोबत आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे.खासगी शाळांमधील शिक्षकांचा शिक्षणाचा दर्जा,शिक्षकांचे वेतन व शासकीय शाळांमधील शिक्षकांचा शिक्षणाचा दर्जा,वेतन यामध्ये असणार्या विरोधाभासाबरोबर शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांना असणारा कामाचा व्याप यावरही शासणाने चिंतण करणे गरजेचे असुन देशाला बलशाली करण्यासाठी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता उभी करण्यासाठी,ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी दुर करण्यासाठी शासणाने,प्रशासणाने अभ्यासपुर्ण नियोजन समितीच गठण करणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वर्तमानपत्राशी बोलताना व्यक्त केले.
देशाला बलशाली करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या~शरद पवळे
युवा शक्ती राष्ट्राची खरी संपत्ती असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तळागाळात जावुन अहोरात्र कष्ट घेणार्या आदर्श शिक्षकांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या समस्यांवर काम केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकताना दिसतील.
शरद पवळे (सामाजिक कार्यकर्ते)

0 Comments